जळगाव ः प्रतिनिधी
नुकतीच दहावी किंवा बारावी झाली की विद्यार्थ्यांची धावपळ ही तहसिल कार्यालयात असतेच, काही विद्यार्थी उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर असो वा आधारकार्ड अपडेट करण्यासाठी विद्यार्थीं व नागरिकांना तहसिल कार्यालयात जावेच लागते, तेथे तुमचा पत्ता वेंडर लोकांसोबत पडतोच व नको त्या समस्या उद्भवतात. त्या वेंडर लोकांचा अरेरावी सुध्दा काही सुज्ञ नागरिकांना ऐकावी लागल्याची घटना जळगाव तहसिल कार्यालय परिसरात नेहमी घडत असते.
नेहमी विद्यार्थ्यांसह नागरिक तहसिल कार्यालयात कागदपत्रोसाठी येत असतात. तहसिल कार्यालयाबाहेर बसलेले वेंडर लोक विद्यार्थ्यांना नेहमी सहकार्य करण्याच्या भूमिकेत असतात, पण काही वेंडर लोक आपल्या पदाचा गैरवापर करीत नागरिकांना अरेरावी सुध्दा करीत असतात. कधी तुमच्याकडे महत्वाची कागदपत्रांची मुद्दांहून जास्त झेरॉक्स काढायला सांगणे, सुट्टे पैसेसाठी अट्टाहास करणे जर सुट्टे पैसे दिले नाही तर 10, 20, 50 रुपयांची तिकीट देण्यास नकार दाखविणे तसेच तहसिल कार्यालयात आमची पूर्ण लाईन आहे, तुमचे काम 100 टक्के होणारच..फक्त पैसे जादा दरात मोजावे लागतील. एका दिवसात सुध्दा काम होते, असे म्हणत नेहमी विद्यार्थ्यांसह नागारिकांना जादा पैशांमध्ये लुबाडत असतात. पण त्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना काम करून घेणे महत्वाचे असते नको तो वाद.. नको ती तक्रार.., आपले काम लवकर होणे महत्वाचे असते. त्यामुळेच हे वेंडर लोक यांचा दरवाढ करुन सतत नागरिकांची फसवणूक करीत असतात. याकडे तहसिलदारांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
यांचे मानावे तितके आभार कमीच…
आजही तहसिल आवारात 40 ते 50 लोक आपला टेबल घेवून नागरिकांच्या अडीअडचणीसाठी बसलेले असतात. खरंच मदत करणारे त्यात फक्त बोटावर मोजण्या इतके लोक आहेत. जे मोफत मार्गदर्शन करून नागरिकांचे काम खरंच मनापासून करून देतात.