अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर तालुक्यातील लोण येथील जवान शहीद झाल्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी दुखवटा जाहीर करण्यात आला. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत ३ जागांसाठी ४०० मतदारांपैकी फक्त तिघांनी मतदान केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावठाण जागेत अतिक्रमण असल्याने लोण येथील नामाप्र, सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला या तीन जागा रिक्त झाल्या होत्या. १८ रोजी या तीन जागांवर मतदान होते. मात्र गावातील लीलाधर नाना पाटील या सैनिकाचा आसाममधून मोहिमेवर जाताना ट्रक मधून पडून मृत्यू झाला होता. याचा दुखवटा संपूर्ण गावाने नये, असा निर्णय गावकर्यांनी १७ रोजी रात्री घेतला. उमेदवार निरंक बाबूलाल पाटील, हिलाल भटा पाटील, अशोक साहेबराव पाटील, लिलाबाई हिलाल पाटील, मनीषा बापूराव पाटील, बापू गंगाराम पाटील व शशिकांत भालचंद्र पाटील यांनीदेखील राजकारण बाजूला ठेवून सामूहिक दुखवट्याला मान्यता दिली.