
जळगाव मिरर | १७ मार्च
आंतरराष्ट्रीय कनिष्ठ विज्ञान ऑलिम्पियाड (IJSO) अंतर्गत घेण्यात येणाऱ्या नॅशनल स्टँडर्ड परीक्षा इन ज्युनियर सायन्स (NSEJS) च्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात जळगाव शहराने अभिमानास्पद यश संपादन केले आहे. इयत्ता ९ वीतील गुणी विद्यार्थी क्षितीज वारके याने संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावत शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण जळगाव शहरातून निवड झालेला तो एकमेव विद्यार्थी ठरला आहे.
क्षितीज हा पेस आयआयटी/मेडिकल, जळगाव या नामांकित संस्थेचा विद्यार्थी असून त्याच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे अथर्व चव्हाण (इयत्ता १२ वी) याने फिजिक्स आणि केमिस्ट्री ऑलिम्पियाडमध्ये राज्यस्तरावर अव्वल स्थान मिळवत दुहेरी यश मिळवले आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यासाठी विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जळगावच्या महापौर दिपमाला काळे तसेच ओरियन शाळेच्या प्राचार्या सुषमा कंची यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते क्षितीज वारके आणि अथर्व चव्हाण या दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कठोर परिश्रम, सातत्य आणि योग्य दिशा यांचे महत्त्व अधोरेखित केले. जयिष्णू आयआयटी गुरुकुलच्या संचालिका सविता वाणी यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक संधी, स्पर्धा परीक्षा आणि यश मिळवण्याचे मार्ग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
शिष्यवृत्ती परीक्षेची घोषणा
विद्यार्थ्यांसाठी ‘ACE of PACE’ प्रवेश व शिष्यवृत्ती परीक्षा २२ मार्च आणि २९ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना १० टक्के ते ४० टक्के तसेच ७० टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
भुसावळमध्ये नवीन शाखेचा शुभारंभ
दर्जेदार व स्पर्धात्मक शिक्षण देण्याच्या उद्देशाने पेस आयआयटी/मेडिकल संस्थेच्या भुसावळ शाखेचा नवीन वास्तूमध्ये शुभारंभ २८ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे. शारदा नगर परिसरात होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यास विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून विविध शैक्षणिक सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या संचालिका सविता वाणी आणि दिलीप वाणी यांनी केले आहे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा निर्माण झाली असून यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.




















