जळगाव मिरर । ८ नोव्हेबर २०२२
भारतीय नौदलात नोकरी मिळत असेल तर कोणतेही पालक व विद्यार्थी नक्कीच स्वप्न रंगवेल पण जिल्ह्यातील एका पालकाने आपल्या पाल्यासाठी नोकरी लागण्यासाठी २ जणावर विश्वास ठेवत पाल्य नोकरी भरती होण्याचे स्वप्न रंगवीत असतानाच त्या परिवाराची तब्बल लाखो रुपयात फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. चोपडा तालुक्यातील अडावद येथील एका शेतकऱ्याच्या मुलाला नोकरीचे आमिष देत ६ लाख ५० हजार रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, अडावद येथील शेतकरी विलास विश्वास पाटील (वय ४५) यांनी आपल्या मुलास भारतीय नौदलात नोकरी लावून देण्यासाठी मुंबईतील कांदिवली येथील पुष्पा रवींद्र साळवी व हेमंत रघुनाथ धाळवे यांच्यासह दोन अल्पवयीन संशयित आरोपींनी आमिष दाखवले. त्यानंतर विलास पाटील यांच्या मुलास नोकरी लावून देण्याचे आमिष देत त्यांचाकडून वेळोवेळी ६ लाख ५० हजार घेत त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अडावद पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.ह.शरीफ तडवी हे करीत आहेत.