जळगाव मिरर | १४ डिसेंबर २०२४
सध्या देशभर ‘पुष्पा 2’ सिनेमाच्या माध्यमातून गाजत असलेल्या अभिनेता अल्लू अर्जुनला न्यायालयाने कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याच्या चाह्त्यामध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती तर शनिवारी सकाळी न्यायालयाने जामीन दिला आहे.
संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ सिनेमासाठी प्रीमियर ठेवलं होतं. जेथे अभिनेता अल्लू अर्जुन देखील पोहोचला होता. तेव्हा अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. याचदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचं निधन झालं. याच प्रकरणी अभिनेत्याला 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली.
संध्या थिएटर चेंगराचेंगरीप्रकरणी अटक करण्यात आलेला तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन शनिवारी सकाळी तेलंगणा उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर आला. अभिनेत्याला 13 डिसेंबर रोजी राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने अभिनेत्याल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर अल्लू अर्जुन याला चंचलगुडा सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलं. अखेर अल्लू अर्जुनने त्याचे वकील अशोक रेड्डी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला, तेथून अभिनेत्याला 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मिळाला.
सांगायचं झालं तर, तेलंगणा उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतरही कागदोपत्री प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे अल्लू अर्जुनला एक तुरुंगात रात्र काढावी लागली. तुरुंगातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन याचा कैदी क्रमांक 7679 होता. अभिनेता संपूर्ण रात्र काही न खाता-पीता जमीनीवर झोपलेला होता. अंडरट्रायल म्हणून पोलिसांनी त्याला मंजिरा बॅरेकमधील वर्ग-1च्या खोलीत ठेवलं होतं. अल्लू अर्जुनची सर्व माहिती कारागृहातील रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आली होती.