जळगाव मिरर / २१ एप्रिल २०२३ ।
गेल्या आठ दिवसापासून राज्यातील राजकारण मोठ्या चर्चेत आले होते त्यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वाद तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा अधांतरी असल्याचं दिसून येत आहे. याशिवाय राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील इतर बातम्यांवरही आपले लक्ष असणार आहे.
मराठा आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. सह्यांद्री अतिथी गृहावर दुपारी १ वाजता ही बैठक पार पडेल. या बैठकीला मंत्री उदय सांमत, शंभूराज देसाईंसह इतर मंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.