
जळगाव मिरर / २२ जून २०२३
जळगाव शहर महानगरपालिकेच्या दि.20 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास शाहून नगरातील दुचाकीस्वार खाली पडून महावितरणच्या खांबाला धडक झाल्यामुळे जागीच तरूण ठार झाल्याची घटना घडली होती. यावर लागलीच भारतीय जनता पार्टीचे माजी उपमहापौर नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे यांनी महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन देत साकडे घातले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दोन दिवसांपुर्वी जळगांव महापालिकेजवळ इलेक्ट्रीक पोलवरील धोकादायक रॉडमुळे स्व.मिलींद सोमनाथ पवार या व्यक्तीला जीव गमवावा लागला यापुर्वीही त्याठीकाणी काही वर्षापुर्वी असा एकाचा जीव गेला होता तरीही तो रॉड आजपर्यंत काढण्यात आलेला नाही. दोन दिवसापूर्वी परत जीव जाऊन सुद्धा तो धोकादायक रॉड काढण्यात आलेला नाही. तरीही तो रॉड त्वरीत काढण्यात यावा किंवा वरती घेण्यात यावा तसेच शहरातील भरपुर ठिकाणी डी.पी.चे दरवाजे उघडेच आहे त्यामुळे सुद्धा जीवीत हानी होऊ शकते ते डी.पी.चे दरवाजे बंद करण्यात यावे तसेच जिथे वायरींचे धोकादायक जाळे असतील ते सुद्धा व्यवस्थीत करण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल तरीही आपणास विनंती की त्वरीत उपाययोजना करण्यात यावी, असे आशयाचे निवेदन डॉ.अश्विन सोनवणे यांनी दिले असून निवेदनावर नगरसेवक धिरज सोनवणे, मिलींद चौधरी, डॉ.राधेश्याम चौधरी, भुषण भोळे, चैतन्य कोल्हे, मुविकोराज कोल्हे, रेखा पाटील, सुवर्णा पाटील, सागर जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.





















