जळगाव मीरर | ९ ऑक्टोबर २०२३
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष खा सुप्रियाताई सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे या अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज पाथर्डी येथे संस्कार भवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील व्यापारी, डॉक्टर, सामजिक, राजकीय कार्यकर्ते , नागरिक यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी परिसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खा सुप्रियाताई सुळे या अध्यक्षस्थानी होत्या. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, महीला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,ज्येष्ठ नेते प्रताप ढाकणे, राजेंद्र फाळके,महीला आघाडी जिल्हाध्यक्ष योगिता राजळे, तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे यांची प्रमुख उपस्थिती होती
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ॲड रोहिणी खडसे यांनी केंद्र व राज्य सरकारवर घणघाती टीकेची प्रहार केला यावेळी त्या म्हणाल्या
सध्या महिलांना चारही बाजूंनी घेरले गेले आहे वाढत्या महागाई मुळे महिलांना जगावे कसे घर कसे चालवावे हा प्रश्न निर्माण झाला आहे आपल्याच कराच्या पैशातून सरकार मोठ मोठया जाहिराती देते. महिलांना मोफत गॅस दिल्याचे सांगते पण गॅस सिलेंडरचे भाव गगनाला नेऊन ठेवल्याने गॅस सिलेंडर घेणे सामान्य व्यक्तीच्या आवाक्या बाहेर होत आहे महिला घरातील कर्त्या पुरुषाकडे गॅस सिलेंडर आणण्यासाठी आग्रह धरतात पण रोजगार नाही हाताला काम धंदा नाही त्यामुळे सिलेंडर घेणे परवडत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सरकारने रोजगार देण्याचे नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले परंतु आता तर शासकिय नोकऱ्या सुध्दा काँट्रॅक्ट पद्धतीने भरल्या जाण्याचा शासन निर्णय घेतला आहे आपला मुलाला शासकिय नोकरी मिळावी असे प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते त्यासाठी ते खस्ता खातात स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन मुलांच्या शिक्षणावर खर्च करतात. मुले सुद्धा प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास करतात एम पी एस सी, यू पी एस सी परीक्षेची तयारी करतात जेणेकरून शासकिय नोकरी मिळून समाजात मान सन्मान मिळेल अशी अपेक्षा असते पण आता या सरकारने घेतलेल्या निर्णयाने शासकीय नोकरीच मिळणार नाही.
सरकार बेटी बचाव बेटी पढाव अभियान राबविते आणि दुसरीकडे सामान्य घरातलील मुलींच्या शिक्षणाचा आधार असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय घेते आहे सरकार शाळा बंद करून दारूचे दुकाने सुरू करत आहे दारू मुळे अनेक महिलांचे संसार उध्वस्त होत आहे आणि हे सरकार त्यात आणखी दारुंचे दुकाने वाढवत आहे. बेटी बचाव बेटी पढाव म्हटले जाते पण राज्यात देशात महिला सुरक्षित नाहीत महिलांवर अत्याचार वाढत आहेत दररोज महिला अत्याचाराचे नवनवीन प्रकरणे घडत आहेत
मणिपूर सारखी महिला आत्यचाराची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून देशातील प्रत्येकाची मान शरमेने खाली झुकवणारी आहे तरी या घटनेतील आरोपीला शिक्षा देण्यास सरकार असमर्थ ठरत आहे.
दिल्ली मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त महिला कुस्तीपटूनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आंदोलन केले पण अन्याय करणारा व्यक्ती सत्ताधारी पक्षाचा खासदार असल्याने महिला कुस्तीपटूना न्याय मिळाला नाही आता सरकार महिला आरक्षणाचे गाजर दाखवत आहे पण देशात महिलाच सुरक्षित नाहीत तर आरक्षणाचे करायचे काय आधी सुरक्षा द्या मग आरक्षण दया. जे महिला आरक्षणाचे विधेयक आणले त्यात एवढ्या अटी आहेत की सध्या तरी ते लागू होइल असे वाटत नाही. शरद पवार साहेब यांनी महिला भगिनींना केव्हाचेच आरक्षण मिळवून दिले आज त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना नेतृत्व करण्याची संधी मिळते आहे शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महिला धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे . हे सरकार आश्वासनाचे गाजर दाखविणारे गाजर सरकार आहे. यापुढे सत्ताधारी पक्षातील लोक मत मागायला आले की त्यांना वाढत्या महागाई बद्दल प्रश्न विचारा भाजप मध्ये पक्ष वाढविणाऱ्या लोकांना त्रास दिला जातो याचे उदाहरण आमचा खडसे परीवार आहे आमच्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीच्या मागे जाणूनबुजून चौकशीचा फेरा लावण्यात आला आहे
ज्याप्रमाणे आ एकनाथराव खडसे यांना भाजप मध्ये त्रास दिला गेला तोच त्रास आता पंकजा ताई मुंडे यांना दिला जात आहे म्हणुन मी पंकजा ताई मुंडे यांची जेव्हा भेट होते त्या प्रत्येक वेळी त्यांना भाजप सोडण्याची विनंती करते. स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदरशनाखाली आ. एकनाथराव खडसे यांनी चाळीस वर्ष भाजप पक्ष वाढविण्याचे काम केले परंतु भाजप आ. एकनाथराव खडसे यांच्या सारख्या व्यक्तींना झाला नाही तो पक्ष तुमच्या आमच्या सारख्या सामान्य व्यक्तींना काय होइल . म्हणुन आगामी काळात योग्य निर्णय घ्या आणि सर्व जाती धर्माला न्याय देणाऱ्या सर्व सामान्यांची जाण असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे राहण्याचे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले