जळगाव मिरर | २ फेब्रुवारी २०२४
जळगाव शहरातील एका परिसरात २८ वर्षीय तरुणाने घरी कुणीही नसताना गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील व्यंकटेश नगरात भुषण प्रभाकर माळी (वय २८) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. एका खासगी कंपनीत काम करुन तो कुटुंबाला हातभार लावित होता. गुरवार दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घरात कोणीही नसतांना भूषण याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच, त्यांनी तात्काळ भूषणला खाली उतरवुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.