जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२३
राज्यातील राष्ट्रवादीच्या दोन खासदारांना संसदेतून निलंबित केल्यानंतर राज्यात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी आक्रमक झाली असून जळगाव जिल्ह्यात देखील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, देशातील संसदेमध्ये दि.१९ डिसेंबर रोजी झालेल्या हल्ल्याबाबत व खासदार शेतीमाल भाववाढी संदर्भात व कांदा निर्यात आदि प्रश्नांबाबत चर्चा करू इच्छित होते परंतु त्यांचे काहीही ऐकून न घेता म.सभापती यांनी खासदारांना निलंबीत केले. त्यात प्रामुख्याने संसदरत्न सुप्रियाताई सुळे व खा. अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. या घटनेचा आम्ही तिव्र निषेध करीत आहोत.
देशात पहिल्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार निलंबित केल्याची घटना घडली आहे. ही लोकशाहीच्या दृष्टीने निंदनीय बाब आहे. देशातील खासदारांना त्यांचे म्हणणे मोडण्याचा अधिकार घटनेने त्यांना दिलेला आहे. परंतु त्यांना त्यांचे म्हणणे न ऐकता निलंबित करणे लांछनास्पद आहे. देशात लोकशाही जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने निलंबन त्वरीत मागे घेण्यात यावे अशी मागणी आपणाकडे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा जळगाव तर्फे करण्यात येत आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, वंदना चौधरी, उमेश पाटील, चेतन पवार, हितेश जावळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.