अमळनेर : विक्की उत्तम जाधव
राज्यातील पावसाचा कहर सुरु असतांना रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल दि.१९ रोजी मध्यरात्री घडली. या घटनेची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील पहाटेच्या सुमारास घ्त्नास्थाली दाखल झाले होते. त्यांनी या घटनेची पाहणी करीत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. यावेळी ना.उदय सामंत, ना.गिरीश महाजन, ना.दादा भुसे व आदी उपस्थित होते.
एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत.
