जम्मू : वृत्तसंस्था
अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान घडली आहे. ज्यावेळी ढगफुटी झाली त्यावेळी १० ते १५ हजार भाविक गुहेजवळ उपस्थित असल्याचे बोलले जात आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ५ ते ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक विजय कुमार यांनी केवळ दोन जणांचे मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
अमरनाथ गुहेपासून एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर ही ढगफुटीची घटना घडली आहे. डोंगरावरून आलेल्या जोरदार पाण्याचे प्रवाहाने भाविकांसाठी उभारलेले सुमारे 25 तंबू आणि दोन लंगर वाहून गेले.
#WATCH | J&K: Visuals from lower reaches of Amarnath cave where a cloud burst was reported at around 5.30 pm. Rescue operation underway by NDRF, SDRF & other associated agencies. Further details awaited: Joint Police Control Room, Pahalgam
(Source: ITBP) pic.twitter.com/AEBgkWgsNp
— ANI (@ANI) July 8, 2022
पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय होऊन अनेकांच्या सामानाचे नुकसान झाले. घटनेनंतर लगेचच जम्मू-काश्मीर पोलिसांच्या पथकाने लष्कर, आयटीबीपी, सीआरपीएफ, एनडीआरएफ आणि एसडीआरएफने बचावकार्य सुरू केले. एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल यांनी सांगितले की, लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले जात असून त्यांना छावण्यांमध्ये नेण्यात येत आहे.
गृहमंत्र्यांनी घेतली माहिती
अपघातानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्याने ट्विट करत म्हटले आहे की, ‘बाबा अमरनाथच्या गुहेजवळ ढगफुटीमुळे आलेल्या अचानक आलेल्या पुराच्या संदर्भात मी एलजी मनोज सिन्हा यांना आवाहन केले. तसेच परिस्थितीचा आढावा देखील घेतला. लोकांचे जीव वाचवणे ही आमची प्राथमिकता आहे.