
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात शिवसेनेतून ४० पेक्षा जास्त आमदार बाहेर पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा शासकीय निवासस्थान सोडले होते यावेळी शिवसैनिकांच्या गहिवरून आले होते. तेव्हा पासून ‘वर्षा’ निवासस्थानामध्ये शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून कुणी जात हि नव्हते पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानावर हण्यास दाखल झाल्याने आता पुन्हा ‘वर्षा’ गजबणार असेच म्हणावे लागेल.
राज्यातील अनेक धक्कादायक घडामोडीनंतर एकनाथ शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आलं. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. मात्र मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ४० दिवसानंतर एकनाथ शिंदे आज वर्षा बंगल्यावर राहण्यास दाखल झाले आहे. वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्यांसाठी राखीव असतो. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे निश्चित झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वीच वर्षा बंगला सोडला होता. त्यावेळी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. आता आज अखेर एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुनावणी आता २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे सत्तासंघर्ष रेंगाळणार अशी चिन्हे आहेत. १२ ऑगस्ट रोजी ही सुनावणी पार पडणार होती. मात्र आता ती १० दिवस लांबणीवर पडली आहे.
आतापर्यंत शिंदे-ठाकरे वादासंदर्भातील पाच याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. मात्र यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यातच सरन्यायाधीश एन.व्ही. रमना हे २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे शिंदे-ठाकरे वाद रेंगाळणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.




















