जळगाव मिरर / ८ एप्रिल २०२३ ।
राज्यात मोठा राजकीय वाद सुरु असतांना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सध्या कुणाचाही संपर्क होत नाही. ते राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह नॉट रिचेबल झाले आहेत, अशी चर्चा सुरु आहे. यासंदर्भात सोशल मीडिया आणि मोबाइलवर मेसेज फिरत आहे. राज्यातील राजकारणात मोठे बदल होणार का? ही चर्चा सुरु आहे.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार सात आमदारांसह नॉट रिचेबल आहेत. अजित पवार यांच्यांशी सध्या कुणाचाही संपर्क होत नसून राष्ट्रवादीच्या सात ते दहा आमदारांसह ते नॉट रिचेबल आहेत, असा मेसेज माध्यमांमध्ये फिरू लागला. अजित पवार यांचे पुण्यातील दोन दिवसांचे कार्यक्रम केले रद्द केले आहे. दरम्यान, या संदर्भात सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटनंतर राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्या आहेत. अजित पवार नॉट रिचेबल असल्याचे काही राजकीय कारण आहे का, असाही प्रश्न विचारला जात आहे.