
जळगाव मिरर / ४ नोव्हेंबर २०२२
सर्वच कधी ना कधी प्रेम केले असते, पण आजही तुम्ही केलेल्या प्रेमाची एकदा प्रसंग डोळ्यासमोर आला तर तुम्हाला नक्की हसू आवरत नसेल पण काही काहीचे वेगळे असते तो प्रसंग जर डोळ्यासमोर आला तर खूप भावनिक होऊन जातात, पण त्या काळात एक वेगळं होत प्रियकर व प्रेयसीला माहित असायचे लग्न होणार नाही तरी जीवापाड प्रेम करायचे. पण आताची तरुणाई प्रेमात काही थोडं दुःख आले कि काहीही करतात. अशीच एक घटना नाशिक येथील प्रियकर व प्रेयसीची झाली आहे. कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्यामुळे प्रेमी युगुल गोव्याला पळून गेले. तिथे जाऊन दोघांनी बनावट ओळखपत्राच्या आधारे एका लॉजवर रुम बूक केली. त्यानंतर त्यांनी आयुष्याची अखेर करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. विष प्राशन केल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला, तर तरुणी बचावली.
गोव्यातील कोलवा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत प्रियकर २१ वर्षांचा होता, तर प्रेयसी २२ वर्षांची आहे. तिच्यावर गोव्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नाशिक येथील गौरव यादवचे २२ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र या संबंधांना दोघांच्या घरच्यांचा कडाडून विरोध होता. त्यामुळे दोघांनी गोव्याला पळून जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यात ते रेल्वेने गोव्याला आले. तिथे दोघं एका लॉजमध्ये थांबले. दोघांनी गोव्यातील कोलवा परिसरात आपले नाव बदलत किशोर अय्यर या बनावट नावाने रूम घेतली. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांनी लग्न करण्याऐवजी त्यांनी विष पिऊन जीव देण्याचा निर्णय घेतला. यातून तरुणी बचावली, तर तरुणाचा जीव गेला.
नाशिक पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली आहे. मुलाचा मृतदेह घेण्यासाठी नातेवाईक गोव्यात दाखल झाले आहेत. तर मुलीचे नातेवाईक ती उपचार घेत असलेल्या रुग्णालयात पोहोचले आहेत. मुलाच्या मृत्यूनंतर तरुणीने गोव्यातील कोलवा पोलिसांना जबाब दिला. दोघंही आपले नाव बदलून गोव्यातील लॉजवर राहत होते. पुढील तपास कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमेनो कोस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. या घटनेने दोन्ही राज्यात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.




















