
जळगाव मिरर | २ जुलै २०२३
देशातील बदलत्या हवामानामुळे व जुलै महिन्याच्या सुरुवातील हवामान विभागाने सर्वच राज्यात पावसाचा इशारा दिला असून हवामान खात्यानुसार, येत्या २४ तासांत बिहारसह १२ राज्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यांबद्दल बोलायचे झाले तर गुजरातमध्ये गेल्या 30 तासात मुसळधार पावसामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. जुनागढ, कच्छ, जामनगर आणि नवसारी या शहरांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. येथे एसडीआरएफ आणि हवाई दल बचाव आणि मदत कार्यात तैनात करण्यात आले आहे.
हिमाचलमध्ये गेल्या आठवड्यात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत नाल्यात पडून एका ऑटोचालकाचा मृत्यू झाला. म्हणजेच, या तीन राज्यांमध्ये 35 मृत्यू झाले आहेत. बिहारमध्ये रोहतासच्या इंद्रपुरीजवळ सोन नदीच्या कटार बाळू घाटावर गेल्या ४० तासांपासून २६ ट्रक अडकून पडले आहेत. राजस्थानमध्ये जूनमध्ये 145.9 मिमी पाऊस सामान्यपेक्षा 3 पट जास्त झाला आहे. राज्यात साधारणपणे जूनमध्ये केवळ 50.7 मिमी पाऊस पडतो. उत्तराखंडमधील चमोली येथे भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग (NH 7) बंद करावा लागला. महामार्ग प्राधिकरण ढिगारा साफ करण्यात गुंतला आहे. यापूर्वी 29 जून रोजीही भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग 17 तासांसाठी बंद करण्यात आला होता.
या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस : बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू. या राज्यांमध्ये हलका पाऊस पडेल: मुसळधार पाऊस झालेल्या सर्व राज्यांच्या काही भागात हलका पाऊसही पडेल. याशिवाय मध्य प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, उत्तर प्रदेशमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. या राज्यांमध्ये हवामान स्वच्छ राहील: राजस्थान , ओडिशा, मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख.






















