
जळगाव मिरर | ४ फेब्रुवारी २०२५
गेल्या काही दिवसापासून राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया हे बीड जिल्ह्यातील खून प्रकरणी चांगलेच आक्रमक झाले असतांना आज दमानिया यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
दमानिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “मंत्री मुंडे यांचे धोरण आणि कामकाज शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही, तर व्यक्तिगत फायदे मिळवण्यासाठी होते. १२ एप्रिल २०१८ रोजीच्या जीआरनुसार सरकारने शेतकऱ्यांसाठी DBT योजना सुरू केली होती. योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष निधी पोहोचवणे होता. परंतु या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पैसे पोहोचत नसल्याची गंभीर चिंता दमानिया यांनी व्यक्त केली.”
उदाहरणार्थ, १८४ लिटरच्या नॅनो युरियाच्या बॉटलची किंमत साधारणतः ९२ रुपये असताना, कृषीमंत्री मुंडे यांच्या आदेशानुसार ती २२० रुपयांना खरेदी करण्यात आली. याप्रकारे १९ लाख ६८ हजार बॉटल्स २२० रुपयांनी खरेदी करण्यात आल्या. याचा एकूण घोटाळा ८८ कोटी रुपयांचा झाला आहे. याशिवाय, ५०० रुपयांच्या बॅटरी स्प्रेअरच्या बॉटल्सला २६९ रुपयांऐवजी ५९० रुपयांना खरेदी करण्यात आल्या, ज्यामुळे याही घोटाळ्याचा एकूण विचार केला जात आहे.
दमानिया यांनी सांगितले की, कृषी विभागाने बॅटरी स्प्रेअर खरेदीसाठी ३४२६ रुपयांमध्ये टेंडर काढले, जरी त्याच उपकरणाचा बाजार भाव २४५० रुपये असावा. या उपकरणांची एकूण खरेदीची किंमत जवळपास २ लाख ३६ हजार ४२७ बॅटरी स्प्रेअरच्या बाबतीत ३ हजार रुपयांच्या वर आहे. अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आवाहन केले आहे की, धनंजय मुंडे यांच्यावर लावलेले आरोप गंभीर आहेत आणि त्यासाठी योग्य पद्धतीने तपास केला जावा. त्याचबरोबर, त्यांनी मुंडे यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.