जळगाव मिरर / २७ मार्च २०२३
काँग्रेस पक्षाचे नेते गेल्या काही दिवसापासून चांगलेच अडचणीत सापडले आहे. त्यात अजून आता एका मोठी अडचणीची भर पडली असल्याने त्यांना आता थेट नवीन घर शोधावे लागणार आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर आता त्यांना लोकसभा सचिवालयानं त्यांना सरकारी बंगला सोडण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेली माहिती अशी कि, खासदारकी रद्द झाल्यानंतर खासदारांना राहण्यासाठीचा बंगलाही त्यांना सोडावा लागू शकतो, अशी चर्चा सुरु होतीच. त्यानुसार, आता त्यांना लोकसभा आवास कमिटीनं हा सरकारी बंगला सोडण्यााची नोटीस दिली आहे. पीटीआयच्या माहितीनुसार, हा बंगला सोडण्यासाठी त्यांना साधारण महिन्याभराचा अवधी देण्यात आला असून २२ एप्रिल २०२३ पर्यंत त्यांना आपला सरकारी बंगला खाली करावा लागणार आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी यापूर्वी एका जाहीर सभेत आपल्याकडं स्व-मालकीचं घर नसल्याचं सांगितलं होतं. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी जाहीर सभेत सांगितलं होतं की, “आपण आता ५२ वर्षांचे आहोत पण अद्यापही माझ्याकडं घर नाही” त्यामुळं जर दिल्लीत राहुल गांधींकडं स्वतःचं घर नसेल तर आता ते कशा पद्धतीनं आपली व्यवस्था मार्गी लावतील अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
लोकसभा से अयोग्य घोषित होने के बाद अब लोकसभा आवास समिति ने कांग्रेस नेता राहुल गांधी को सरकार द्वारा आवंटित बंगला खाली करने का नोटिस दिया है: सूत्र
(फाइल तस्वीर) pic.twitter.com/woMv9HMWk4
— ANI_HindiNews (@AHindinews) March 27, 2023
बदनामीच्या फौजदारी प्रकरणात सूरतच्या जिल्हा कोर्टानं राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षाही ठोठावली आहे. त्यामुळं कायद्यानुसार, जर एखाद्या लोकप्रतिनिधीला फौजदारी खटल्यात दोन किंवा त्यापेक्षा जास्त काळाची शिक्षा झाली तर त्याचं पद रद्द आपोआप रद्द होतं. याच नियमानुसार, राहुल गांधींवर लोकसभा सचिवालयानं कारवाई करत नुकतीच त्यांची खासदारकी रद्द केली होती.