जळगाव मिरर | २९ सप्टेंबर २०२३
देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच आपल्या कामामुळे चर्चेत येत असतात. नुकतेच वाशिम येथील कार्यक्रमात नितीन गडकरींनी एक मोठ वक्तव्य केले आहे.
मंत्री गडकरी म्हणाले कि, एक काळ असा होता की विदर्भाचा विकास झालेला नव्हता. मात्र आता तशी परिस्थिती नाही. विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वपक्षीयांनी प्रयत्न केले आहेत, यापुढेही केले पाहिजेत. आपण आत्तापेक्षा आणखी पुढे जाऊ असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. तसंच आपण जेव्हा आमदार नव्हतो तेव्हा नागपूरविषयी आणि विदर्भाविषयी काय उत्तर दिलं होतं तो किस्साही नितीन गडकरींनी सांगितला. तसंच यावेळी आपण हल्ली कुणालाही फुकट मदत करत नाही लोकांना वाटतं याच्याकडे हरामाचा पैसा आहे असंही वक्तव्य नितीन गडकरींनी आपल्या भाषणात केलं आहे.
मी ज्यावेळी आमदार नव्हतो नव्हतो तेव्हा आम्ही काही मित्र मिळून पीव्हीसी पाईपचं मशीन घ्यायला गेलो होतो. त्यावेळी आम्हाला विचारणा झाली की तुम्ही नागपूरहून म्हणजे विदर्भातून आलात का? मी म्हटलं हो आम्ही नागपूरहून आलो, ते विदर्भातच येतं. मग त्या व्यापाऱ्याने आम्हाला विचारलं विदर्भाचा विकास झाला आहे का? मी म्हटलं होतं नाही. मग ते मला म्हणाले नागपूरमध्ये लोकसंख्या किती आहे? मी त्यांना उत्तर दिलं २२ लाख. ते म्हणाले तिकडे उद्योग व्यवसाय आहेत का? मी म्हटलं जास्त नाहीत. मग त्यांनी मला विदर्भाची लोकसंख्या विचारली मी उत्तर दिलं पाच कोटी वगैरे असेल, तिथेही उद्योग व्यवसाय नाही. मग त्यांनी विचारलं इतके लोक काय करतात? मी त्यांना उत्तर दिलं होतं.