जळगाव मिरर | २१ ऑगस्ट २०२३
देशात १९९५ या वर्षी चित्रपटसृष्टीमध्ये पहिल्यांदा माधुरी दीक्षित आणि संजय कपूर यांनी एकत्र काम केला आहे. त्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतला होता. या दोघांनी पहिल्यांदा हा चित्रपटमध्ये काम केले व प्रेक्षकांच्या मनामध्ये या जोडीने आगळे वेगळे स्थान निर्माण केले होते.
या चित्रपटात माधुरी, संजय यांच्यासह परेश रावल, मुकेश खन्ना, दलीप ताहिल, रीता भादुरी आणि हिमाी शिवपुरी यांनीही महत्त्वाच्या भुमिका साकारल्या होत्या. या दरम्यान या सिनेमात अभिनेते नाना पाटेकर देखील दिसले असते. खरतंर त्यांनी सिनेमातील काही सीन्स शुट देखील केले होतं.
2-3 दिवस त्यांनी शुट केलं पण अचानक दिग्दर्शकानं नाना पाटेकरांना सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला होता.IMDBच्या रिपोर्टनुसार, सिनेमात राजा ही भुमिका साकारून अभिनेते परेश रावल रातोरात स्टार झाले होते. ही भुमिका खरंतर नाना पाटेकर साकारणार होते. सिनेमात परेश रावल बृजनाथ म्हणजे बिरजू ही भुमिका साकारणार होते. जो मानसिकरित्या आजारी आहे.
असं म्हणतात की, परेश रावल यांच्या मुळ भुमिकेसाठी नाना पाटेकर पहिली पसंती होती. त्यांनी शुटींगही केलं मात्र दिग्दर्शकांनी यात दखल घेतली.हेही 104 तापानं रात्रभर फणफणली माही विजची लेक; रुग्णालयात जाताच झालं गंभीर आजाराचं निदानदिग्दर्शकाने नाना पाटेकरांच्या भुमिकेबद्दल वारंवार ढवळाढवळ केल्याने निर्माते इंद्र कुमार नाराज झाले आणि त्यांना नाना पाटेकरांपासून वेगळं होणंच पसंत केलं. त्यामुळे 2-3 दिवसातच नानांना सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवून त्यांची भुमिका परेश रावल यांना दिली.मीडिया रिपोर्टनुसार, नाना पाटेकर यांनी जेव्हा सिनेमा सोडला तेव्हा निर्मात्यांनी अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना संपर्क केला होता. पण त्यांनी सिनेमा करण्यास नकार दिला. मानसिकरित्या विक्षिप्त असलेल्या व्यक्तीची भुमिका त्यांना साकाराची नव्हती. या भुमिकेसाठी त्यांना शारिरीक आणि मानसिकरित्या खूप तयारी करावी लागणार होती आणि यात त्यांची खूप दमछाक होणार याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या भुमिका करायच्या नव्हत्या.