जळगाव मिरर | १५ जून २०२४
राज्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर आज दि. १५ रोजी महाविकास आघडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले कि, महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपला नाकारले आहे. तरीही त्यांना शहाणपण आलेले नाही. सत्तेचा सरळ-सरळ गैरवापर केला जात आहे. येणाऱ्या तीन चार महिन्यानंतर जनता त्यांना उत्तर देईल, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी आज (15 जून) महाआघाडी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित होते. यानंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेतली.लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपला नाकारले आहे. आता पुढील विधानसभा निवडणुकीत जनताच त्यांना पुन्हा उत्तर देईल, असा दावा करत देशात जातीय जनगणना करण्यावर आमच्यामध्ये एकमत आहे, असेही पवारांनी यावेळी सांगितले.