
जळगाव मिरर | ८ जुलै २०२४
राज्यात विधानसभा निवडणुक येण्यापूर्वीच सत्ताधारी व विरोधक यांच्यावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
पटोले म्हणाले कि, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान आहे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ज्यांनी खोटं बोलून सत्ता घेतली तो खोटे नॅरेटिव्हबद्दल बोलत असेल तर काय? असे ते म्हणाले. मुंबईतील वरळीमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. यावरून पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ”महाराष्ट्राच्या विकासाची गती थांबवण्यासारखा या घटना आहेत. या सरकारला सत्तेचा माज आला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही. मात्र, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सिरीयस माणूस अजिबात नाही. आपली खुर्ची वाचवणे, भ्रष्टाचार आणि कटकारस्थान निर्माण करणे हे त्यांच्यासाठी गौरव आणि अभिमानाचा” असल्याची बोचरी पटोले यांनी केली.
तसेच यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. फडणवीस स्वतः बद्दल नॅरेटिव्ह तयार करतात. ज्यांनी खोटं बोलून सत्ता घेतली तो खोटे नॅरेटिव्हबद्दल बोलत असेल तर काय? फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी खोटं नॅरेटिव्ह पसरवलं. फडणवीसच याचे मास्टरमाईंड आहेत. विधानपरिषद निवडणुकीत चुकीचा नॅरेटिव्ह पसरवले जात आहे, आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील”, असा हल्ला पटोले यांनी चढवला आहे.






















