जळगाव मिरर | ७ जुलै २०२३
राज्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला व उद्धव ठाकरे यांच्या गटाला गेल्या काही महिन्यापासून मोठ मोठे धक्के बसू लागले आहे. तर नुकतेच उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अखेर शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. आज सकाळपासूनच त्यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा सुरु होती. अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थित आहे. मुख्यमंत्र्यांनी भगवी शाल देऊन नीलम गोऱ्हे यांचं शिवसेनेत स्वागत केलं.
पक्ष प्रवेशानंतर नीलम गोऱ्हे यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरची भूमिका विषद केली. आपली कोणतीही नाराजी नाही, असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल होत आहेत. मात्र त्या बंडानंतरचा हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण नीलम गोऱ्हे ह्या केवळ विधान परिषदेच्या आमदार नाहीत तर त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहे. महत्त्वाचं म्हणजे नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता तेव्हापासून त्या अत्यंत संयमाने, नेटाने आणि अभ्यासू वृत्तीने शिवसेनेची बाजू मांडत आहेत. नीलम गोऱ्हे ह्या केवळ एक राजकीय नेत्या नाहीत तर त्यांनी उपेक्षित, पीडित महिलांसाठी मोठं काम उभं केलेलं आहे. एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून नीलम गोऱ्हेंकडे बघितलं जातं. आजचा त्यांचा निर्णय हा ठाकरे गटातली उरली सुरली नारजी चव्हाट्यावर आणणारा आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने ठाकरेंना धक्का बसला आहे.