
जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२४
स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकावर आरोप प्रत्यारोप होत आहे. आगामी काळात लोकसभा निवडणूक होवू घातली आहे. त्यापूर्वीच राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
खा.संजय राऊत म्हणाले कि, भाजपाचा हिंदूत्व हे घर जाळणार हिंदूत्व आहे. देशात जाती-धर्माच्या आधारावर नाही, तर रामासोबत कामही मिळाल पाहिजे. रोजगाराची चूल पेटली पाहिजे. आम्ही या देशाचा पाकिस्तान-इराण होऊ देणार नाही’ “देशात भाजपाशिवाय दुसरा कुठला पक्ष राहू नये, या दिशेने निवडणूक आयोग काम करतोय” असं संजय राऊत म्हणाले. ‘दाढीने काडी केली, तर तुमची लंका जळून जाईल’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
त्यावर संजय राऊत म्हणाले की, “लंका त्यांचीच आहे, आम्ही हनुमान आहोत. लंका रावणाची जळते. दाढी रावणाला होती, रामाला नाही. हे समजून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना रामायण, महाभारात वाचाव लागेल” यशवंतराव चव्हाणांपासून महाराष्ट्राला सुस्कृंत मुख्यमंत्री मिळाले आहेत. साहित्य, कला, काव्य यामध्ये ते रमायचे असं संजय राऊत म्हणाले.
“कोणाच काय जळतय हे लवकरच कळेल. मुळात दिल्लीची लंका जळतेय. तम्ही जिथे गेलाय, त्यांचीच लंका जळणार. विचार चोरुन मिळत नसतात. सध्या चोरटे, भामटे यांच राज्य आहे. डायलॉगबाजी सांगू नका. आम्ही बाळासाहेबांच्या तालिमीत तयार झालो आहोत. त्यामुळे आम्हाला डायलॉग येतात” असं संजय राऊत म्हणाले. “तुझी दाढी दिल्लीच्या हातात आहे. दिल्लीला वाटेल, तेव्हा दाढी खेचून तुला बोलवतात. रावणाची लंका होती. महाराष्ट्रात पंचवटीला रामाच वास्तव्य होतं. तुझ्या दाढीला आग लावणार” असं संजय राऊत म्हणाले.