जळगाव मिरर | ८ मे २०२३
यंदाच्या वर्षात देखील सोन्याची चमक कायम असून यात चांगलीच वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. उच्चांकी दरवाढीमुळे ताेळ्याला तब्बल ६२ हजार रुपयांपेक्षा जास्त दर गेल्या काही दिवसांपूर्वी होवून गेला हाेता. मात्र, आता भाववाढ तसेच सततच्या उतार-चढावामुळे साेन्याची मागणी १७ टक्क्यांनी घटली आहे.
मार्च महिन्यात संपलेल्या तिमाहीत ११२ टन एवढी मागणी हाेती. याचा साेने आयातीवर माेठा परिणाम झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात तब्बल २४ टक्क्यांनी आयात घटून ३५ अब्ज डाॅलरवर आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत साेन्याची मागणी १३५.५ टन हाेती. यावर्षी मागणी आणखी घटण्याचा अंदाज आहे. साेन्याच्या दागिन्यांचीही मागणी ९४ टनांच्या तुलनेत घटून ७८ टन एवढी होती. वाढलेल्या किमतीचा फटका बसला आहे. रत्न आणि दागिन्यांची निर्यात ३ टक्क्यांनी घटून ३८ अब्ज डॉलर एवढी झाली आहे. पाच वर्षातील सोन्याचे भाव पाहता ते दुप्पटपेक्षा अधिक झाले आहे. २०१८मध्ये सोने ३०,३०० रुपयांवर होते. ते थेट ६२,१०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. या ५ वर्षात कोरोना काळात सर्वाधिक वाढ झाली. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारताने एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ मध्ये ६०० टन साेन्याची आयात केली.