जळगाव मिरर | २८ मे २०२३
देशात सध्या मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक दुचाकीसह चारचाकीचे उत्पन्न सुरु असून त्यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील नागपुरात मोठी घोषणा करतना सांगितले आहे की, आता आपण इथून पुढे पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारमध्ये बसणार नाही. गडकरी दिल्लीत हायड्रोजन कार आणि नागपुरात इलेक्ट्रिक कार वापरतात, मात्र पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी त्यांना बुलेटप्रूफ कारशिवाय अन्य कोणत्याही कारमध्ये बसू देत नाहीत. या कारणामुळे मला या गाडीत बसावे लागले आहे, पण आता पेट्रोल, डिझेल असलेल्या गाडीत बसणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी नागपुरातील एका कार्यक्रमात म्हणाले की, प्रत्येकाने इलेक्ट्रॉनिक स्कूटर खरेदी करावी. ते खूप फायदेशीर आहे. हळूहळू देशातून पेट्रोल आणि डिझेलची वाहने संपुष्टात येतील. इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या कंपन्या भारतात उघडल्या आहेत. गडकरी यांनी अनेक प्रसंगी सांगितले आहे की, देशभरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. आज देशात 20.8 लाख इलेक्ट्रिक वाहने आहेत. 2021 च्या तुलनेत, 1 दशलक्ष अधिक इलेक्ट्रिक वाहने आहेत. त्यांची संख्या 300 टक्क्यांनी वाढली आहे. त्यांच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत दोन कोटी वाहने असतील, असा विश्वास गडकरींना आहे.