जळगाव मिरर | ३ डिसेंबर २०२३
देशातील काही राज्यात आज विधानसभा निवडणुकीचे निकाल येत असून आता राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या १९९ जागांसाठी मतदान पार पडलं. काँग्रेस उमेदवाराच्या निधनामुळं करणपूर विधानसभेची निवडणूक पुढं ढकलण्यात आली आहे.विधानसभेच्या 199 जागांसाठी 1 हजार 863 उमेदवार रिंगणात आहे, त्यांचं भवितव्य 5 कोटी 25 लाख 38 हजार 105 मतदारांनी मतदान पेटीत बंद केलं आहे. राज्यात गेल्या २५ वर्षांपासून दरवर्षी सत्ता बदलते.
सालाबादप्रमाणे राज्यातील सत्ता बदलणार की, राजस्थानची जनता पुन्हा काँग्रेसलाच संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये भाजपला १०० ते ११० आणि काँग्रेसला ९० ते १०० जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अपक्ष यांना ५ ते १० जागा मिळतील असेही एक्झिट पोल सांगत आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्द भाजपचे महेंद्रसिंह राठोड, उपमुख्यमंत्री सचिन पायलट विरुद्द भाजपचे अजित सिंह, भाजप नेत्या वसुंधरा राजे विरुद्ध काँग्रसचे रामलाल चौहान या प्रमुख लढती आहेत.