जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२३
राज्यात गेल्या महिन्याभरापासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण मिळावे यासाठी अनेक दौरे व सभा देखील घेतल्या तर सरकारला ४१ दिवस दिल्यावर देखील निर्णय सरकारने न घेतल्याने आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. आजपासून पुन्हा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होण्यापूर्वीच राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला. यावेळी महाजनांनी जरांगेना उपोषणाला बसू नका, अशी वारंवार विनंती केली. मात्र उपोषणाचा निर्णय मागे घेणार नाही. असे थेट उत्तर जरांगेनी गिरीश महाजन यांना दिले. यानंतरही महाजन यांनी जरांगे पाटील यांना विनंती केली. तुम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. हा आमचा शब्द आहे. मागच्या वेळी आम्हीच आरक्षण दिलं होतं. त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही आरक्षण देणारच आहोत. तुम्ही टोकाचा निर्णय घेऊ नका, असे गिरीश महाजन म्हणाले. यावेळी जरांगे म्हणाले, तुम्ही दोन दिवसात गुन्हे मागे घेतो असे म्हटला होता. अजूनही घेतले नाही. गुन्हे मागे घेतले नाही, आरक्षण काय देणार? असा सवालच महाजनांना त्यांनी केला आहे.